Monday, November 28, 2016

दोस्ती


दोस्ती
वैसे तो दोस्ती के बारेमे बहोत लोगो ने बोलके रखा है
पर आज मौका है तो मुझेभी ये छोड़ना नही है

वैसे तो हमारा हर रिश्ता बहोत खास होता है
मगर दोस्तो की तो बात ही कुछ अलग होती है
और उसमेभी इस कम्बक्त IT वर्ल्ड मे अछा दोस्त मिलना मुश्किल होता है 

But you know कभी कभी miracle हो जाते है
और चुपके से याराना बन जाता है
जो हमेशा हर घड़ी तुम्हे सपोर्ट करता है

पर जिंदगी का एक दस्तूर है 
हर वक्त एक जैसा होता नई है
और आज भी कुछ ऐसेही होने जा रहा है

पर हमेशा याद आएँगी लंच टेबल पे शेर की हुई कहानियाँ
साथ मे celebrate की हुई पार्टियाँ
और छोटू छोटू लधाइयाँ

पता है पता है अभी सब बोलेंगे
की कोई नही यार हम मिलते रहेंगे
पर बाद मे हमेशा सभी कुछ ना कुछ बहाने मारेन्गे

But कोई problem नई तुम दूर रहो या पास
तुम हमेशाही रहोगे हमारे खास
क्योकि what's up  और skype तो है ही हमारे पास

अब लास्ट मे इतना ही क़हना है
की जिंदगी मे हमेशा तुमको खुश रहना है
और हर बुलंदियों को चुना है..
                                                                                                                         शरयू पाटील
                                                                                                                         24-11-2016
                                                                                              Created on occasion of farewell of friend

Saturday, June 18, 2016

बाबा

बाबा

खरच बाबा म्हणजे घराचा पाया
ज्यांच्या मनात साठलेली असते आई एवढीच माया

प्रतेकजण सारखा कसा राहील
जो तो आपापले प्रेम व्यक्तच कसे करील
सगळे सारखे असता वेगळेपण कसे राहील
म्हणून तर देवाने सर्वांना वेगवेगळ्या साच्यात बनविल

बाबा प्रत्येक गोष्ट सांगत नसतात
ते सतत आपल्या कामात असतात
त्यांच म्हणन की   सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात 
म्हणून तर काही वाईट वाटल की  ते फक्त शांत बसून राहतात

सतत असते त्यांना घराची काळजी
गुंतलेले असतात जमा करण्यात जन्माची पुंजी
कधी लक्षही देत नाहीत की त्यांची कपडे होतायत खूजी
नेहमी हसत मुखाणे प्रत्येकाच्या कामाल होतात राजी

कठोर, कर्तृत्वं, दयाळू असतात ते बाबाच
अन् संकटात आपल्याला आठवतात ते बाबाच
प्रत्येक अडचण स्वत:ची समजुण धावतात ते बाबच
म्हणून तर आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार हे बाबाच

               - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2009 [वय वर्षे-19]

Friday, June 17, 2016

तुम्हारा साथ


तुम्हारा साथ

आज के इस खास दिन कुछ कहना चाहती हू तुमसे
क्योंकि इसी दिन हम जुड़ गये थे दिल से

पहेली नज़र मे ही लगा था की तुमही हो मेरे साथी
और आज मै यही कहूँगी की तुमही हो मेरे महारथी

लगता नही की इतने दीनो से हम साथ है
क्योंकी आज भी तुममे वही पहेली वाली महेक है

तुम्हे अंदाज़ा भी नही की हम तुमपे कितना मरते है
ज़रूरत पड़े तो तुमपे जान छिड़कने के लिए भी तयार है

जी करता है की हरपल  तुम्हारे साथ रहू
और दुनिया के सारे सुख तुमपे निछावर करु

मूज़े तुमसे कुछ भी शीकायत नही
क्योंकि ऐसा कुछ भी नही जो तुमने मुझे दिया नही

 अब जिंदगी मे मुझे और कुछ नई चाहिए
 बस यूँही हर पल मेरे साथ रहिए

                             कविता लिहिलेला दिनांक - २९-०१-२०१६
                                                        [एका मैत्रीणीसाथी तिच्यालग्नाच्या वाढदिवसाला म्हनून लिहुन   दिलेली ]

Sunday, June 12, 2016

पाऊस

पाऊस

तुला माहितीये लहानपणी फिरायला जाताना तू वाटायचास नकोसा
पण पुन्हा कळाल तूच तर देतोस जगाला दिलासा

तुझ्याविना फूल नाही पान नाही काहीच नाही
तू पहिल्यांदा येतोस तेव्हा अंगाची करतोस लाही लाही
पण पुन्हा देतोस शेतकर्यांच्या यशाची ग्वाही
त्यामुळेच तर त्यांच्या घरी सुख-सम्रुधि वाही

कधी कधी अपेक्षेपेक्षा अधिक पडतोस अफाट
मग शेतातली सगळी पिके करतोस सपाट
कधी कधी जून जूलै पर्यंत पाहायला लावतोस वाट
आणि जमीन अगदी होते कोरडी फकाट

तुझमुळे सगळी रस्ते भरतात तुडुंब
पण आमच्या पोटात मात्र फुटतो आटम बॉम्ब
कारण त्यामुळे शाळेत जायची होते बॉम्बाबोंब
म्हणून तर म्हणते ना तू ये आता ताबडतोब

तू कधी काय घेऊन  येशील सांगता येत नाही
कधी सुख तर कधी दु:ख पण रिकामी हाती येणार नाही
हेच तुझे वेशिष्ट्य हो की नाही
आता सगळे तुझी वाट पाहतात मग सांग तू येणार का नाही

                         - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2007 [वय वर्षे-१७]


Sunday, April 24, 2016

स्वप्न माझ

स्वप्न माझ 


अजूनही अस वाटत की स्वप्नात आहे मी
जेव्हा स्वत:ला पाहते आरश्यात मी

वाटल नव्हत कधी की तू होशील माझा
अन्  बहरेल संसार तुझा मझा

आज वर्ष पूर्ण झालाय आपल्या लग्नाला
पण  भासते असे की तू कालच तर भेटला मला 

तू नेहमी आपल्याबाबतीत होतास सकारात्मक
पण माझी आपली सतत कॅसेट नकारात्मक

शेवटी मी हारले आणि आपण जिंकलो
सगळ मागे सोडून आपण पुढे निघालो

स्वप्न पूर्ण झाल माझ तूझ्या हातून लाईसन्स घालायच
आणि तुझी बायको म्हणून घेऊन जगभर मिरवण्याच

देव असेल तर आज एकच मागन माझ
की प्रत्येक जन्मी हेच खूळ होऊ दे माझ 

                                                         कविता लिहिलेला दिनांक - १५-०४-२०१६
                                                        [on occasion of first marriage anniversary]

Friday, April 8, 2016

तुझ बोलन

तुझ बोलन

लोकांशी अगदी नीट वागायच
आपल म्हणून गल्याला पडायाच
आपल्या घरच्यांशी मात्र कसही वागायच
थोड  काही म्हटल म्हणून रुसून बसायच
म्हणून तर म्हणतात शेवटी घरच ते घरचच

भ्रम असतो की लोकांशी नीट वागल की ते नाव घेतात
पण घरच्यांशी कसाही वागा शेवटी ते माफ करतात
एक हे की लोकांकडून भेटतो तो खोट्या प्रेमाचा मारा
आपल्यांकडून भेटतो तो कळकळीच्या प्रेमाचा मारा
शेवटी हाच तर असतो दोघंतला खरा दूरा

दुरून पाहिलेल क्षितिज नेहमी सुंदरच वाटत
तस तर नाही ना वाटत आपल्याला लोकंबाबत
नाही दिसत घरच्यांची तळमळ प्रेम
पण लोकांची दिसती ती खोटी आशा खोटे गम
म्हणून तर म्हणतात दुरून डोंगर साजरच वाटत

आपले सांगतात ती वाटते कीटकीट
मित्र मैत्रिणी लोक सांगतात ते चांगलअसो वा वाईट
वळण बिघडवणार असो वा चुकवणार वाट पण वाटते ती आपली वाट
आणि घरच्यांच चांगल, वाटत खोट नाट
पण शेवटी ज्याची निवड त्यावरूनच ठरते आयुष्याची वाट

                                                          -  कविता लिहिलेला  दिनांक - १३-12-२००६[वय वर्षे-१७]


Saturday, February 27, 2016

वेळ

वेळ
प्रथम तुला समजता न कळले तुझे महत्व
फक्त ऐकले होते मी सर्वांकडून तुझ्या जीवनाचे तत्व

सगळे वागतात अगदी तुझ्या नियमाने
जो तो प्रयत्न करतो आपापल्या परीने
जो चुकतो तो विसरतो आपली भाणे
आन् जो पाळतो तो राहतो सन्मानाने

किती  आहेस ग तू नियम.बद्ध
कधीच नसतेस तू बेशुद्ध
तू म्हणजे सगळ्यांचा कटीबंद्ध
खरच तुझ्यामुळे बणलो आम्ही शिस्तबद्ध

तुझ्यामुळे वाढते जीवन जगण्याची तळमळ
असते सतत काहीतरी करून दाखवण्याची मरमर
सादांकडा सर्वांच्या पुढे जाण्याची मरमर
अन् उंच झेंडा झळकवण्याची तळमळ

तू आहेस म्हणून आम्ही आहोत एका बंधनात
नाही तर सगळेच नाचले असते आपापल्या तालात
कुणी कुणाला मानल नसत 
अन् जग झाल असत अगदी अस्ताव्यस्त


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

माणुसकी

माणुसकी

आज माणुसकी राहलीय का कुणाला
सगळे विचारतात ते फक्त कामाला

हे अस वागण का कशासाठी? कळत नाही मला
अहो मागेपुढे पाहतात साधे बोलण्याला हसण्याला
कधी वाटत दिवसाबरोबर बदल असावाच लागतो का माणुसकीला
अस करून काय मिळत ते माहीत त्याच माणसाला

मैत्री मैत्री राहिली नाही
नात नात राहील नाही
असे सम्बधच आता का हे कळत नाही
आणि यामुळेच माणूस माणूस राहिला नाही

त्याला त्रास होतो ना माग होऊ देत
इथे कुणाच्या कुणाच काय जात
जवळ या जर चालत असेल माझ भात
नाहीतर व्हायच आपापल्या वाटेनी चालत

हा येतो तो येतो नाव ठेवतो एकमेकांना 
पण तुझ्यात बघ तोच .तर तू नाहीस ना
लक्षात ठेव माणसा आपण एकटचे असतो येताना अन् जाताना
त्यामुळेच तर माणुसाकीने वागावे जीवन जगताना   


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

आशेचा किरण

आशेचा किरण

जीवनात हवा एक आशेचा किरण
त्यास पाहून रचावे आयुष्याचे धोरण

हाच किरण नेतो आपणास पुढे
आणि तोच शिकवितो जीवनाचे पाढे
त्यामुळेच तर जाते आयुष्याची गाडी मागे पुढे

हाच दाखवितो जगण्याची दिशा
त्यामुळे वाढते काही करण्याची आशा
आणि सुरू होते आयुष्यात यशाची परिभाषा

यामुळे जाणवतो जगातला दोष
तोच दाखवितो त्यांच्यातला रोष
आणि आपणास भेटतो जगाशी तोंड देण्याचा विचारकोष

या किरणामुळे एकिकडून भेटतो तो विरंगुळा 
आणि एकिकडून भेटेतो तो आयुष्यभींतीत रोवयचा मोळा
त्यामुळेच तर तयार होतो जीवनात एक सोनेरी गोळा

म्हणून तर जीवनात हवा एक आशेचा किरण
जो करी आयुष्य समृद्ध आणि संपन्न

- शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

शिक्षण

शिक्षण

शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध
त्याशिवाय लागत नाहीत जीवनातला शोध

हे मिळवन म्हणजे मधामाशासारखी गत
यात कसे प्रत्येक माशी भरवते आपले हात
त्याचप्रमाणे हे पूर्ण करण्यासाठी करावी लागते प्रत्येक परीक्षेवर मत
मगच तर जीवन फिरत यशाच गान गात

याशिवाय जगात मिळत नाही कोठे मान
हे नसेल तर पदोपदी होतो अपमान
जर मिळवायचा असेल सर्वांकडून मान
तर गुरुजनांकडून घ्यावे लागते विद्याचे दान

जीवनात वा जगात अवघड काही नसते
फक्त ती मिळवण्याची इच्छाशक्ती असावी लागते
जेव्हा हे आपल्या मनात ठाम भिनते
तेव्हा शिक्षणच आपली साथ देऊ लागते

खरच शिक्षणाशिवाय नाही दुसर दागीन
यामुळेच तर आपल्याला मिळत नवीन जीवन
यामुळेच तर आपल्याला भेटत यशलाविण्य
आणि मग उलगडत आपल्या यशाच दालन

- शरयु पाटील
                            - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

Friday, January 29, 2016

जीवन

जीवन


जीवन म्हणजे एक संघर्षच नवे का?
जिथे फाटेल तिथे घालायचा टाका

जबाबदारी,तडजोडी हीच ना व्याख्या जीवनाची
यात सदा न कदा वाट पाहावी लागते सुखाची
कधी क्षणं दु:खाची तर कधी आनंदाची
पण हिंमत ठेवायची ती सुखदु:खाना सामोरे जायची

खरं सांगू हा तर जणू खेळच असतो डोंबार्‍याचा
ज्यात प्रत्येकजण प्रयत्न करतो दोरीवारुन चालण्याचा
जो सावधनगिरीने पार करतो तोच विजेता या खेळाचा
खरा हाच तर तो असतो क्षण मजेचा 

ही परीक्षा असते तेथे वडीलधारे येतात मदत करायला
त्यात शिकायच असत ते एकमेकांना सावरायला
आणि सज्ज व्हायच असत जीवन फुलवायला
म्हणून तर तो नंतर तोंड देऊ शकतो जगाला

संकटे येतात संकटे जातात घाबरायच नसत कधी त्याला
कारण ते येतात आपली परीक्षा घ्यायला
म्हणून नेहमी सज्ज असाव त्याच्या स्वागताला
अन् पचवून त्याला चोख उत्तर द्यावे दैवाला
                                                                                   
                                                                           कविता लिहिलेला दिनांक - १८-६-२००७ [वय वर्षे १७]

Thursday, January 28, 2016

मैत्री

मैत्री

मैत्री म्हणजे दोन जिवामधल नात
जे प्रत्येकाला ह्वह्वस वाटत

कळतच नाही कधी होऊन जातो आपण समोरच्याच
मनातल सांगायला भेटत कुणीतरी हक्काच
कधीच न तुटणार अनमोल बंधन जन्माच
नात नसत ते रक्ताच तर ते असत मनाच

जात नसते पात नसते असते ते फक्त निर्मळ मन
अन् हवाहवासा वाटणारा असतो तो प्रत्येक क्षण
खूप कमी जणांच्या नशिबी असत हे देण 
पण ज्यांना हे लाभतं तो असतो भाग्यवान 

सुखदुखच्यावेळी कामी येणारं
खर्याखोट्याची जाणीव करून देणारं
प्रत्येक क्षण वाटून घेणारं
अन् आपल्याबद्दल चांगला विचार करणारं

मैत्रीत एका वेगळ्याच प्रेमाचा धागा गुंतला जातो 
धागा म्हटल की तो कधी ना कधी तुटतो
पण हा त्यातला नसतो
कारण हा मनातल्या घट्ट तारांनी  बणलेला असतो


                                                                             कविता लिहिलेला दिनांक - २०-६-२००७ [वय वर्षे-१७]

लहानपण

लहानपण


लहानपनीचे दिवसच ते चंदेरी
आठवले की जग होते सोनेरी

होतेच ते क्षण मौज मस्तीचे
बसल्या बसल्या खोड्या करण्याचे
आणि मग पाठीत धपाटे खाण्याचे
नंतर कोपर्‍यात रुसून बसण्याचे

आवडायच तासन् तास  मातीत बसायला
त्यापासून काहीतरी बणवून लागायच खेळायला
पण मधेच कुणीतरी विलण यायचा खेळ मोडायला
कारण पाउस  तयारच असायचा कधीही पडायला

रडत रडत आईचा हात धरून जायच शालेला
पण डोळे मात्र सादानकदा शाळेच्या घंटीला 
कधी एकदा वाजते आणि मी होते मोकळी खेळायला
कारण अभ्यासाचा सगळा लोड दिला होता आईला

सुट्ट्या लागल्या की जायच कुठेही फियायला
मनसोक्त मोकळ्या जगात हिंडायाला
वाटलही नव्हत की मोठे झल्यावर इतके काटे असतात जीवनाला
खरचं लहानपण ते लहानपण दृष्ट न लागो त्या वयाला


                                                                  कविता लिहिलेला  दिनांक - १८-०६-२००७ [वय वर्षे-१७]