Saturday, February 27, 2016

वेळ

वेळ
प्रथम तुला समजता न कळले तुझे महत्व
फक्त ऐकले होते मी सर्वांकडून तुझ्या जीवनाचे तत्व

सगळे वागतात अगदी तुझ्या नियमाने
जो तो प्रयत्न करतो आपापल्या परीने
जो चुकतो तो विसरतो आपली भाणे
आन् जो पाळतो तो राहतो सन्मानाने

किती  आहेस ग तू नियम.बद्ध
कधीच नसतेस तू बेशुद्ध
तू म्हणजे सगळ्यांचा कटीबंद्ध
खरच तुझ्यामुळे बणलो आम्ही शिस्तबद्ध

तुझ्यामुळे वाढते जीवन जगण्याची तळमळ
असते सतत काहीतरी करून दाखवण्याची मरमर
सादांकडा सर्वांच्या पुढे जाण्याची मरमर
अन् उंच झेंडा झळकवण्याची तळमळ

तू आहेस म्हणून आम्ही आहोत एका बंधनात
नाही तर सगळेच नाचले असते आपापल्या तालात
कुणी कुणाला मानल नसत 
अन् जग झाल असत अगदी अस्ताव्यस्त


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

माणुसकी

माणुसकी

आज माणुसकी राहलीय का कुणाला
सगळे विचारतात ते फक्त कामाला

हे अस वागण का कशासाठी? कळत नाही मला
अहो मागेपुढे पाहतात साधे बोलण्याला हसण्याला
कधी वाटत दिवसाबरोबर बदल असावाच लागतो का माणुसकीला
अस करून काय मिळत ते माहीत त्याच माणसाला

मैत्री मैत्री राहिली नाही
नात नात राहील नाही
असे सम्बधच आता का हे कळत नाही
आणि यामुळेच माणूस माणूस राहिला नाही

त्याला त्रास होतो ना माग होऊ देत
इथे कुणाच्या कुणाच काय जात
जवळ या जर चालत असेल माझ भात
नाहीतर व्हायच आपापल्या वाटेनी चालत

हा येतो तो येतो नाव ठेवतो एकमेकांना 
पण तुझ्यात बघ तोच .तर तू नाहीस ना
लक्षात ठेव माणसा आपण एकटचे असतो येताना अन् जाताना
त्यामुळेच तर माणुसाकीने वागावे जीवन जगताना   


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

आशेचा किरण

आशेचा किरण

जीवनात हवा एक आशेचा किरण
त्यास पाहून रचावे आयुष्याचे धोरण

हाच किरण नेतो आपणास पुढे
आणि तोच शिकवितो जीवनाचे पाढे
त्यामुळेच तर जाते आयुष्याची गाडी मागे पुढे

हाच दाखवितो जगण्याची दिशा
त्यामुळे वाढते काही करण्याची आशा
आणि सुरू होते आयुष्यात यशाची परिभाषा

यामुळे जाणवतो जगातला दोष
तोच दाखवितो त्यांच्यातला रोष
आणि आपणास भेटतो जगाशी तोंड देण्याचा विचारकोष

या किरणामुळे एकिकडून भेटतो तो विरंगुळा 
आणि एकिकडून भेटेतो तो आयुष्यभींतीत रोवयचा मोळा
त्यामुळेच तर तयार होतो जीवनात एक सोनेरी गोळा

म्हणून तर जीवनात हवा एक आशेचा किरण
जो करी आयुष्य समृद्ध आणि संपन्न

- शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

शिक्षण

शिक्षण

शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध
त्याशिवाय लागत नाहीत जीवनातला शोध

हे मिळवन म्हणजे मधामाशासारखी गत
यात कसे प्रत्येक माशी भरवते आपले हात
त्याचप्रमाणे हे पूर्ण करण्यासाठी करावी लागते प्रत्येक परीक्षेवर मत
मगच तर जीवन फिरत यशाच गान गात

याशिवाय जगात मिळत नाही कोठे मान
हे नसेल तर पदोपदी होतो अपमान
जर मिळवायचा असेल सर्वांकडून मान
तर गुरुजनांकडून घ्यावे लागते विद्याचे दान

जीवनात वा जगात अवघड काही नसते
फक्त ती मिळवण्याची इच्छाशक्ती असावी लागते
जेव्हा हे आपल्या मनात ठाम भिनते
तेव्हा शिक्षणच आपली साथ देऊ लागते

खरच शिक्षणाशिवाय नाही दुसर दागीन
यामुळेच तर आपल्याला मिळत नवीन जीवन
यामुळेच तर आपल्याला भेटत यशलाविण्य
आणि मग उलगडत आपल्या यशाच दालन

- शरयु पाटील
                            - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७