Friday, April 8, 2016

तुझ बोलन

तुझ बोलन

लोकांशी अगदी नीट वागायच
आपल म्हणून गल्याला पडायाच
आपल्या घरच्यांशी मात्र कसही वागायच
थोड  काही म्हटल म्हणून रुसून बसायच
म्हणून तर म्हणतात शेवटी घरच ते घरचच

भ्रम असतो की लोकांशी नीट वागल की ते नाव घेतात
पण घरच्यांशी कसाही वागा शेवटी ते माफ करतात
एक हे की लोकांकडून भेटतो तो खोट्या प्रेमाचा मारा
आपल्यांकडून भेटतो तो कळकळीच्या प्रेमाचा मारा
शेवटी हाच तर असतो दोघंतला खरा दूरा

दुरून पाहिलेल क्षितिज नेहमी सुंदरच वाटत
तस तर नाही ना वाटत आपल्याला लोकंबाबत
नाही दिसत घरच्यांची तळमळ प्रेम
पण लोकांची दिसती ती खोटी आशा खोटे गम
म्हणून तर म्हणतात दुरून डोंगर साजरच वाटत

आपले सांगतात ती वाटते कीटकीट
मित्र मैत्रिणी लोक सांगतात ते चांगलअसो वा वाईट
वळण बिघडवणार असो वा चुकवणार वाट पण वाटते ती आपली वाट
आणि घरच्यांच चांगल, वाटत खोट नाट
पण शेवटी ज्याची निवड त्यावरूनच ठरते आयुष्याची वाट

                                                          -  कविता लिहिलेला  दिनांक - १३-12-२००६[वय वर्षे-१७]


9 comments: