Saturday, June 18, 2016

बाबा

बाबा

खरच बाबा म्हणजे घराचा पाया
ज्यांच्या मनात साठलेली असते आई एवढीच माया

प्रतेकजण सारखा कसा राहील
जो तो आपापले प्रेम व्यक्तच कसे करील
सगळे सारखे असता वेगळेपण कसे राहील
म्हणून तर देवाने सर्वांना वेगवेगळ्या साच्यात बनविल

बाबा प्रत्येक गोष्ट सांगत नसतात
ते सतत आपल्या कामात असतात
त्यांच म्हणन की   सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात 
म्हणून तर काही वाईट वाटल की  ते फक्त शांत बसून राहतात

सतत असते त्यांना घराची काळजी
गुंतलेले असतात जमा करण्यात जन्माची पुंजी
कधी लक्षही देत नाहीत की त्यांची कपडे होतायत खूजी
नेहमी हसत मुखाणे प्रत्येकाच्या कामाल होतात राजी

कठोर, कर्तृत्वं, दयाळू असतात ते बाबाच
अन् संकटात आपल्याला आठवतात ते बाबाच
प्रत्येक अडचण स्वत:ची समजुण धावतात ते बाबच
म्हणून तर आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार हे बाबाच

               - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2009 [वय वर्षे-19]

Friday, June 17, 2016

तुम्हारा साथ


तुम्हारा साथ

आज के इस खास दिन कुछ कहना चाहती हू तुमसे
क्योंकि इसी दिन हम जुड़ गये थे दिल से

पहेली नज़र मे ही लगा था की तुमही हो मेरे साथी
और आज मै यही कहूँगी की तुमही हो मेरे महारथी

लगता नही की इतने दीनो से हम साथ है
क्योंकी आज भी तुममे वही पहेली वाली महेक है

तुम्हे अंदाज़ा भी नही की हम तुमपे कितना मरते है
ज़रूरत पड़े तो तुमपे जान छिड़कने के लिए भी तयार है

जी करता है की हरपल  तुम्हारे साथ रहू
और दुनिया के सारे सुख तुमपे निछावर करु

मूज़े तुमसे कुछ भी शीकायत नही
क्योंकि ऐसा कुछ भी नही जो तुमने मुझे दिया नही

 अब जिंदगी मे मुझे और कुछ नई चाहिए
 बस यूँही हर पल मेरे साथ रहिए

                             कविता लिहिलेला दिनांक - २९-०१-२०१६
                                                        [एका मैत्रीणीसाथी तिच्यालग्नाच्या वाढदिवसाला म्हनून लिहुन   दिलेली ]

Sunday, June 12, 2016

पाऊस

पाऊस

तुला माहितीये लहानपणी फिरायला जाताना तू वाटायचास नकोसा
पण पुन्हा कळाल तूच तर देतोस जगाला दिलासा

तुझ्याविना फूल नाही पान नाही काहीच नाही
तू पहिल्यांदा येतोस तेव्हा अंगाची करतोस लाही लाही
पण पुन्हा देतोस शेतकर्यांच्या यशाची ग्वाही
त्यामुळेच तर त्यांच्या घरी सुख-सम्रुधि वाही

कधी कधी अपेक्षेपेक्षा अधिक पडतोस अफाट
मग शेतातली सगळी पिके करतोस सपाट
कधी कधी जून जूलै पर्यंत पाहायला लावतोस वाट
आणि जमीन अगदी होते कोरडी फकाट

तुझमुळे सगळी रस्ते भरतात तुडुंब
पण आमच्या पोटात मात्र फुटतो आटम बॉम्ब
कारण त्यामुळे शाळेत जायची होते बॉम्बाबोंब
म्हणून तर म्हणते ना तू ये आता ताबडतोब

तू कधी काय घेऊन  येशील सांगता येत नाही
कधी सुख तर कधी दु:ख पण रिकामी हाती येणार नाही
हेच तुझे वेशिष्ट्य हो की नाही
आता सगळे तुझी वाट पाहतात मग सांग तू येणार का नाही

                         - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2007 [वय वर्षे-१७]