Monday, August 21, 2017

नातं


नातं

कोणतंही  नातं  मानन्यावर  असत
जमलं  तर  जमत  नाहीतर  फसत  
आणि  मधलं  तर  कधीच  कामाचं  नसत

just निभवायचं   म्हणून  निभावण्यात  काहीच  अर्थ  नसतो
पण  तरी  आपण  कितीतरी  वेळा  हेच  करतो
वेळ  साधून  नेणं  कदाचित  आपण  यालाच  म्हणतो

प्रत्येक  फसलेल्या  नात्याला  काहीतरी  background असत
काहीतरी  बोलेल  किंवा  वागलेलं  मनात  कोपऱ्यात  कुठेतरी  असत
कारण  ते  बोलणं  बाण  बनून  मनाला  छेडलेलं  असत

का  असतो  माणूस  असा , का  नाही भरत  तो  छेद  मनाचा
का  बनतो  तो  शब्द  अतिमहत्वाच्या
का  नेहमी  शेमबुड  दिसतो  दुसऱ्याच्याच  नाकाचा

चूक  कधीच  एकाची  नसते
बेरीज  कधीच   दुसऱ्या  अंकाशिवाय  होत  नसते
आणि  टाळी  कधीच  एका  हाताने  वाजत  नसते

शेवटी  काय  नातं  नको  म्हणलं  तरी  निभाव  लागत
म्हणून  आपलं  मानून  राहिलेलं  बरं  असत 
कारण  झालं  गेलं  विसरून  राहण  सगळ्यासाठी  चांगलं  असत

               - कविता लिहिलेला दिनांक: 10 जून 2017

No comments:

Post a Comment