Sunday, April 24, 2016

स्वप्न माझ

स्वप्न माझ 


अजूनही अस वाटत की स्वप्नात आहे मी
जेव्हा स्वत:ला पाहते आरश्यात मी

वाटल नव्हत कधी की तू होशील माझा
अन्  बहरेल संसार तुझा मझा

आज वर्ष पूर्ण झालाय आपल्या लग्नाला
पण  भासते असे की तू कालच तर भेटला मला 

तू नेहमी आपल्याबाबतीत होतास सकारात्मक
पण माझी आपली सतत कॅसेट नकारात्मक

शेवटी मी हारले आणि आपण जिंकलो
सगळ मागे सोडून आपण पुढे निघालो

स्वप्न पूर्ण झाल माझ तूझ्या हातून लाईसन्स घालायच
आणि तुझी बायको म्हणून घेऊन जगभर मिरवण्याच

देव असेल तर आज एकच मागन माझ
की प्रत्येक जन्मी हेच खूळ होऊ दे माझ 

                                                         कविता लिहिलेला दिनांक - १५-०४-२०१६
                                                        [on occasion of first marriage anniversary]

Friday, April 8, 2016

तुझ बोलन

तुझ बोलन

लोकांशी अगदी नीट वागायच
आपल म्हणून गल्याला पडायाच
आपल्या घरच्यांशी मात्र कसही वागायच
थोड  काही म्हटल म्हणून रुसून बसायच
म्हणून तर म्हणतात शेवटी घरच ते घरचच

भ्रम असतो की लोकांशी नीट वागल की ते नाव घेतात
पण घरच्यांशी कसाही वागा शेवटी ते माफ करतात
एक हे की लोकांकडून भेटतो तो खोट्या प्रेमाचा मारा
आपल्यांकडून भेटतो तो कळकळीच्या प्रेमाचा मारा
शेवटी हाच तर असतो दोघंतला खरा दूरा

दुरून पाहिलेल क्षितिज नेहमी सुंदरच वाटत
तस तर नाही ना वाटत आपल्याला लोकंबाबत
नाही दिसत घरच्यांची तळमळ प्रेम
पण लोकांची दिसती ती खोटी आशा खोटे गम
म्हणून तर म्हणतात दुरून डोंगर साजरच वाटत

आपले सांगतात ती वाटते कीटकीट
मित्र मैत्रिणी लोक सांगतात ते चांगलअसो वा वाईट
वळण बिघडवणार असो वा चुकवणार वाट पण वाटते ती आपली वाट
आणि घरच्यांच चांगल, वाटत खोट नाट
पण शेवटी ज्याची निवड त्यावरूनच ठरते आयुष्याची वाट

                                                          -  कविता लिहिलेला  दिनांक - १३-12-२००६[वय वर्षे-१७]


Saturday, February 27, 2016

वेळ

वेळ
प्रथम तुला समजता न कळले तुझे महत्व
फक्त ऐकले होते मी सर्वांकडून तुझ्या जीवनाचे तत्व

सगळे वागतात अगदी तुझ्या नियमाने
जो तो प्रयत्न करतो आपापल्या परीने
जो चुकतो तो विसरतो आपली भाणे
आन् जो पाळतो तो राहतो सन्मानाने

किती  आहेस ग तू नियम.बद्ध
कधीच नसतेस तू बेशुद्ध
तू म्हणजे सगळ्यांचा कटीबंद्ध
खरच तुझ्यामुळे बणलो आम्ही शिस्तबद्ध

तुझ्यामुळे वाढते जीवन जगण्याची तळमळ
असते सतत काहीतरी करून दाखवण्याची मरमर
सादांकडा सर्वांच्या पुढे जाण्याची मरमर
अन् उंच झेंडा झळकवण्याची तळमळ

तू आहेस म्हणून आम्ही आहोत एका बंधनात
नाही तर सगळेच नाचले असते आपापल्या तालात
कुणी कुणाला मानल नसत 
अन् जग झाल असत अगदी अस्ताव्यस्त


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

माणुसकी

माणुसकी

आज माणुसकी राहलीय का कुणाला
सगळे विचारतात ते फक्त कामाला

हे अस वागण का कशासाठी? कळत नाही मला
अहो मागेपुढे पाहतात साधे बोलण्याला हसण्याला
कधी वाटत दिवसाबरोबर बदल असावाच लागतो का माणुसकीला
अस करून काय मिळत ते माहीत त्याच माणसाला

मैत्री मैत्री राहिली नाही
नात नात राहील नाही
असे सम्बधच आता का हे कळत नाही
आणि यामुळेच माणूस माणूस राहिला नाही

त्याला त्रास होतो ना माग होऊ देत
इथे कुणाच्या कुणाच काय जात
जवळ या जर चालत असेल माझ भात
नाहीतर व्हायच आपापल्या वाटेनी चालत

हा येतो तो येतो नाव ठेवतो एकमेकांना 
पण तुझ्यात बघ तोच .तर तू नाहीस ना
लक्षात ठेव माणसा आपण एकटचे असतो येताना अन् जाताना
त्यामुळेच तर माणुसाकीने वागावे जीवन जगताना   


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

आशेचा किरण

आशेचा किरण

जीवनात हवा एक आशेचा किरण
त्यास पाहून रचावे आयुष्याचे धोरण

हाच किरण नेतो आपणास पुढे
आणि तोच शिकवितो जीवनाचे पाढे
त्यामुळेच तर जाते आयुष्याची गाडी मागे पुढे

हाच दाखवितो जगण्याची दिशा
त्यामुळे वाढते काही करण्याची आशा
आणि सुरू होते आयुष्यात यशाची परिभाषा

यामुळे जाणवतो जगातला दोष
तोच दाखवितो त्यांच्यातला रोष
आणि आपणास भेटतो जगाशी तोंड देण्याचा विचारकोष

या किरणामुळे एकिकडून भेटतो तो विरंगुळा 
आणि एकिकडून भेटेतो तो आयुष्यभींतीत रोवयचा मोळा
त्यामुळेच तर तयार होतो जीवनात एक सोनेरी गोळा

म्हणून तर जीवनात हवा एक आशेचा किरण
जो करी आयुष्य समृद्ध आणि संपन्न

- शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

शिक्षण

शिक्षण

शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध
त्याशिवाय लागत नाहीत जीवनातला शोध

हे मिळवन म्हणजे मधामाशासारखी गत
यात कसे प्रत्येक माशी भरवते आपले हात
त्याचप्रमाणे हे पूर्ण करण्यासाठी करावी लागते प्रत्येक परीक्षेवर मत
मगच तर जीवन फिरत यशाच गान गात

याशिवाय जगात मिळत नाही कोठे मान
हे नसेल तर पदोपदी होतो अपमान
जर मिळवायचा असेल सर्वांकडून मान
तर गुरुजनांकडून घ्यावे लागते विद्याचे दान

जीवनात वा जगात अवघड काही नसते
फक्त ती मिळवण्याची इच्छाशक्ती असावी लागते
जेव्हा हे आपल्या मनात ठाम भिनते
तेव्हा शिक्षणच आपली साथ देऊ लागते

खरच शिक्षणाशिवाय नाही दुसर दागीन
यामुळेच तर आपल्याला मिळत नवीन जीवन
यामुळेच तर आपल्याला भेटत यशलाविण्य
आणि मग उलगडत आपल्या यशाच दालन

- शरयु पाटील
                            - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

Friday, January 29, 2016

जीवन

जीवन


जीवन म्हणजे एक संघर्षच नवे का?
जिथे फाटेल तिथे घालायचा टाका

जबाबदारी,तडजोडी हीच ना व्याख्या जीवनाची
यात सदा न कदा वाट पाहावी लागते सुखाची
कधी क्षणं दु:खाची तर कधी आनंदाची
पण हिंमत ठेवायची ती सुखदु:खाना सामोरे जायची

खरं सांगू हा तर जणू खेळच असतो डोंबार्‍याचा
ज्यात प्रत्येकजण प्रयत्न करतो दोरीवारुन चालण्याचा
जो सावधनगिरीने पार करतो तोच विजेता या खेळाचा
खरा हाच तर तो असतो क्षण मजेचा 

ही परीक्षा असते तेथे वडीलधारे येतात मदत करायला
त्यात शिकायच असत ते एकमेकांना सावरायला
आणि सज्ज व्हायच असत जीवन फुलवायला
म्हणून तर तो नंतर तोंड देऊ शकतो जगाला

संकटे येतात संकटे जातात घाबरायच नसत कधी त्याला
कारण ते येतात आपली परीक्षा घ्यायला
म्हणून नेहमी सज्ज असाव त्याच्या स्वागताला
अन् पचवून त्याला चोख उत्तर द्यावे दैवाला
                                                                                   
                                                                           कविता लिहिलेला दिनांक - १८-६-२००७ [वय वर्षे १७]