Saturday, February 27, 2016

वेळ

वेळ
प्रथम तुला समजता न कळले तुझे महत्व
फक्त ऐकले होते मी सर्वांकडून तुझ्या जीवनाचे तत्व

सगळे वागतात अगदी तुझ्या नियमाने
जो तो प्रयत्न करतो आपापल्या परीने
जो चुकतो तो विसरतो आपली भाणे
आन् जो पाळतो तो राहतो सन्मानाने

किती  आहेस ग तू नियम.बद्ध
कधीच नसतेस तू बेशुद्ध
तू म्हणजे सगळ्यांचा कटीबंद्ध
खरच तुझ्यामुळे बणलो आम्ही शिस्तबद्ध

तुझ्यामुळे वाढते जीवन जगण्याची तळमळ
असते सतत काहीतरी करून दाखवण्याची मरमर
सादांकडा सर्वांच्या पुढे जाण्याची मरमर
अन् उंच झेंडा झळकवण्याची तळमळ

तू आहेस म्हणून आम्ही आहोत एका बंधनात
नाही तर सगळेच नाचले असते आपापल्या तालात
कुणी कुणाला मानल नसत 
अन् जग झाल असत अगदी अस्ताव्यस्त


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

माणुसकी

माणुसकी

आज माणुसकी राहलीय का कुणाला
सगळे विचारतात ते फक्त कामाला

हे अस वागण का कशासाठी? कळत नाही मला
अहो मागेपुढे पाहतात साधे बोलण्याला हसण्याला
कधी वाटत दिवसाबरोबर बदल असावाच लागतो का माणुसकीला
अस करून काय मिळत ते माहीत त्याच माणसाला

मैत्री मैत्री राहिली नाही
नात नात राहील नाही
असे सम्बधच आता का हे कळत नाही
आणि यामुळेच माणूस माणूस राहिला नाही

त्याला त्रास होतो ना माग होऊ देत
इथे कुणाच्या कुणाच काय जात
जवळ या जर चालत असेल माझ भात
नाहीतर व्हायच आपापल्या वाटेनी चालत

हा येतो तो येतो नाव ठेवतो एकमेकांना 
पण तुझ्यात बघ तोच .तर तू नाहीस ना
लक्षात ठेव माणसा आपण एकटचे असतो येताना अन् जाताना
त्यामुळेच तर माणुसाकीने वागावे जीवन जगताना   


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

आशेचा किरण

आशेचा किरण

जीवनात हवा एक आशेचा किरण
त्यास पाहून रचावे आयुष्याचे धोरण

हाच किरण नेतो आपणास पुढे
आणि तोच शिकवितो जीवनाचे पाढे
त्यामुळेच तर जाते आयुष्याची गाडी मागे पुढे

हाच दाखवितो जगण्याची दिशा
त्यामुळे वाढते काही करण्याची आशा
आणि सुरू होते आयुष्यात यशाची परिभाषा

यामुळे जाणवतो जगातला दोष
तोच दाखवितो त्यांच्यातला रोष
आणि आपणास भेटतो जगाशी तोंड देण्याचा विचारकोष

या किरणामुळे एकिकडून भेटतो तो विरंगुळा 
आणि एकिकडून भेटेतो तो आयुष्यभींतीत रोवयचा मोळा
त्यामुळेच तर तयार होतो जीवनात एक सोनेरी गोळा

म्हणून तर जीवनात हवा एक आशेचा किरण
जो करी आयुष्य समृद्ध आणि संपन्न

- शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

शिक्षण

शिक्षण

शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध
त्याशिवाय लागत नाहीत जीवनातला शोध

हे मिळवन म्हणजे मधामाशासारखी गत
यात कसे प्रत्येक माशी भरवते आपले हात
त्याचप्रमाणे हे पूर्ण करण्यासाठी करावी लागते प्रत्येक परीक्षेवर मत
मगच तर जीवन फिरत यशाच गान गात

याशिवाय जगात मिळत नाही कोठे मान
हे नसेल तर पदोपदी होतो अपमान
जर मिळवायचा असेल सर्वांकडून मान
तर गुरुजनांकडून घ्यावे लागते विद्याचे दान

जीवनात वा जगात अवघड काही नसते
फक्त ती मिळवण्याची इच्छाशक्ती असावी लागते
जेव्हा हे आपल्या मनात ठाम भिनते
तेव्हा शिक्षणच आपली साथ देऊ लागते

खरच शिक्षणाशिवाय नाही दुसर दागीन
यामुळेच तर आपल्याला मिळत नवीन जीवन
यामुळेच तर आपल्याला भेटत यशलाविण्य
आणि मग उलगडत आपल्या यशाच दालन

- शरयु पाटील
                            - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

Friday, January 29, 2016

जीवन

जीवन


जीवन म्हणजे एक संघर्षच नवे का?
जिथे फाटेल तिथे घालायचा टाका

जबाबदारी,तडजोडी हीच ना व्याख्या जीवनाची
यात सदा न कदा वाट पाहावी लागते सुखाची
कधी क्षणं दु:खाची तर कधी आनंदाची
पण हिंमत ठेवायची ती सुखदु:खाना सामोरे जायची

खरं सांगू हा तर जणू खेळच असतो डोंबार्‍याचा
ज्यात प्रत्येकजण प्रयत्न करतो दोरीवारुन चालण्याचा
जो सावधनगिरीने पार करतो तोच विजेता या खेळाचा
खरा हाच तर तो असतो क्षण मजेचा 

ही परीक्षा असते तेथे वडीलधारे येतात मदत करायला
त्यात शिकायच असत ते एकमेकांना सावरायला
आणि सज्ज व्हायच असत जीवन फुलवायला
म्हणून तर तो नंतर तोंड देऊ शकतो जगाला

संकटे येतात संकटे जातात घाबरायच नसत कधी त्याला
कारण ते येतात आपली परीक्षा घ्यायला
म्हणून नेहमी सज्ज असाव त्याच्या स्वागताला
अन् पचवून त्याला चोख उत्तर द्यावे दैवाला
                                                                                   
                                                                           कविता लिहिलेला दिनांक - १८-६-२००७ [वय वर्षे १७]

Thursday, January 28, 2016

मैत्री

मैत्री

मैत्री म्हणजे दोन जिवामधल नात
जे प्रत्येकाला ह्वह्वस वाटत

कळतच नाही कधी होऊन जातो आपण समोरच्याच
मनातल सांगायला भेटत कुणीतरी हक्काच
कधीच न तुटणार अनमोल बंधन जन्माच
नात नसत ते रक्ताच तर ते असत मनाच

जात नसते पात नसते असते ते फक्त निर्मळ मन
अन् हवाहवासा वाटणारा असतो तो प्रत्येक क्षण
खूप कमी जणांच्या नशिबी असत हे देण 
पण ज्यांना हे लाभतं तो असतो भाग्यवान 

सुखदुखच्यावेळी कामी येणारं
खर्याखोट्याची जाणीव करून देणारं
प्रत्येक क्षण वाटून घेणारं
अन् आपल्याबद्दल चांगला विचार करणारं

मैत्रीत एका वेगळ्याच प्रेमाचा धागा गुंतला जातो 
धागा म्हटल की तो कधी ना कधी तुटतो
पण हा त्यातला नसतो
कारण हा मनातल्या घट्ट तारांनी  बणलेला असतो


                                                                             कविता लिहिलेला दिनांक - २०-६-२००७ [वय वर्षे-१७]

लहानपण

लहानपण


लहानपनीचे दिवसच ते चंदेरी
आठवले की जग होते सोनेरी

होतेच ते क्षण मौज मस्तीचे
बसल्या बसल्या खोड्या करण्याचे
आणि मग पाठीत धपाटे खाण्याचे
नंतर कोपर्‍यात रुसून बसण्याचे

आवडायच तासन् तास  मातीत बसायला
त्यापासून काहीतरी बणवून लागायच खेळायला
पण मधेच कुणीतरी विलण यायचा खेळ मोडायला
कारण पाउस  तयारच असायचा कधीही पडायला

रडत रडत आईचा हात धरून जायच शालेला
पण डोळे मात्र सादानकदा शाळेच्या घंटीला 
कधी एकदा वाजते आणि मी होते मोकळी खेळायला
कारण अभ्यासाचा सगळा लोड दिला होता आईला

सुट्ट्या लागल्या की जायच कुठेही फियायला
मनसोक्त मोकळ्या जगात हिंडायाला
वाटलही नव्हत की मोठे झल्यावर इतके काटे असतात जीवनाला
खरचं लहानपण ते लहानपण दृष्ट न लागो त्या वयाला


                                                                  कविता लिहिलेला  दिनांक - १८-०६-२००७ [वय वर्षे-१७]