Friday, March 8, 2019

स्त्री-सन्मान


गोष्ट १:

नचिकेता… एक Software Engineer, Married. दररोज सकाळी उठणे, आवरणे,ऑफीसला जाणे हा दररोजचा उपक्रम. सासू-सासरे, मोठी नणंद सगळे सोबत राहतात. सकाळी सगळ्यांच आवरून ही ऑफीस साठी ८ वाजता निघते. ऐकल तर नवल वाटण्यासारखंच, एवढ्या सगळ्या लोकांच ती एकटीने करते पहाटे उठून आणि ठीक 8 वाजता बाहेर पडते ते पण कुणाचीही मदत नाही, अगदी कामवाल्या बाईची सुद्धा नाही. फॅमिली अगदी गडगंज आहे पण तरी सासूचा अट्टहास असतो कीं सगळ तूच करायच आम्ही नाही का केल? ही तशी या विषयावर गप्प नाही बसत पण शेवटी काही चालत नाही तीच. नचिकेता तशी खूप बडबडी, एकदम मन मोकळी, बिनधास्त आहे. सगळ एकदम नेटाने करते. तीच सगळ एकदम हॅपी हॅपी सुरू असत, कोणत्या गोष्टींचा ती कधी ताण नाही घेत. But still तिला वाटत की somewhere something is missing. कारण मुद्दा कधी तरी कुणी समजून घेण्याचा असतो.

त्या दिवशी वीकेंड होता काही इंपॉर्टेंट काम असल्याने नचिकेताला ऑफीसला जाव लागलेल. तब्बल १४ तसानंतर ती घरी आलेली, रात्रीचे ९ वाजलेले असावेत. घरी मात्र एकदम जल्लोष सुरू होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि हे दिवस म्हणजे मुली माहेरी राहायला येण्याचे आणि या दिवसात तिची मोठी नणंद पण बरेच दिवसापासून आलेली. मग सोबत तिचे बच्चे, कुणी ८ मध्ये तर कुणी १२ वि मध्ये आणि तिचा नवरा असे सगळे आलेले. so घरी सगळ्यांची मस्ती सुरू होती. त्या दिवशी ती प्रचंड थकलेली, पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे तिची या अवस्थेत अगदी कुणाला बोलायची इच्छा सुद्धा नव्हती एवढी कंटाळून गेलेली. तिने सगळ्यांना स्माइल केली आणि फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेली तेवढ्यात सासूने आवाज दिला " नचिकेता, अग दिवसभर तर नव्हती घरात निदान आत्ता तरी ये बोलायला".

नचिकेता: "हो हो आले, फ्रेश होतेय"

मग नचिकेता फ्रेश होऊन हॉल मध्ये गेली.

सासू: "अग आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो, ते तू पनीर ची भाजी फार छान करतेस ना सगळ्यांना आवडते तुझ्या हाताची, कर ना आज ती"

नचिकेता: "अरे तुमची जेवण झाली नाहीत आणखीन? मला वाटल जेवण वगेरे करून तुम्ही गप्पा मारत बसला आहात"

नणंद: "अहो नाही वाहिनी तुमचीच वाट पाहत होतो, आज दिवसभर शॉपिंग ला गेलेलो ना मग तिथे चटर पटर खाल्लो. पण आता जाम भूक लागली आहे, बनवा ना पटकन जेवायला"

नचिकेता: "ओके, लागते मी तयारीला"

नचिकेताला वाटलेल की आता घरी जाऊन निवांत खाऊन झोपी जावे पण सगळे उलटे झाले नेहमीप्रमाणे, म्हणजे एरवी घरी ऑफीस मधून लवकर येणं होत तेव्हा कामाच काही नाही वाटत पण अशावेळी... मग ती स्वयंपाक घरात गेली आणि पाहते तर काय फक्त भाजी नाही तर सगळा स्वयंपाक राहिलेला. तिने एकटीने सगळ बनवल आणि रात्री ११ वाजता जेवणं झाली.

As earlier said that she still feels something is missing कारण प्रश्न कधी काम करण्याचा नसतो तर समजून घेण्याचा असतो.

गोष्ट २:

नुकतीच दिवाळी झालेली, नंदिनी आणि राज आपापल्या घरी आलेले मुंबईला. परत सगळा दिनक्रम सुरू झालेला हॉस्पिटल ला जाण येणं . एक ८ दिवसानी घरी फोन झालेला तेव्हा कळालं की राजचे आई-बाबा मुंबईला येत आहेत काही कामासाठी. खर तर त्याच्या बाबांनी  बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक जागा विकत घेतलेली, तेव्हा आता त्या जागेवर घर बंधायला सुरू करायच होत. मग एक दोन दिवसांनी ते आले. त्या सगळ्यांच म्हणजेच राज, त्याचे आई- बाबा आणि त्याची बहीण आणि तिचा नवरा अशा सगळ्यांचं architect कडे जाण सुरू होत, planning and all. राजची बहीण तिथेच राहते म्हणून ते दोघेपण (दोघे म्हणजे she and her husband) सगळ्या गोष्टींमधे नेहमी असतात.

ते दोघे तिथे राहतात म्हणून ते नेहमी प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी असतात पण नंदिनी तिथे घरात असून पण ती कधीच कुठल्या गोष्टीचा part नसते आणि ही गोष्ट राजच्या आई-वडिलांची आहे आणि त्यांच्या मध्ये त्यांना जर नंदिनी नको वाटत असेल तर कशाला म्हणून राज उगाच तिला कशात अडकवत नाही कारण अस उगाच तिला मध्ये आणल्यावरही तिला नेग्लेक्टच केल जात. त्यादिवशी यांनी आर्किटेक्टकडून प्लान बनवून आणलेला. घरी बसून सगळ्यांची चर्चा सुरू होती. नंदिनी किचन मध्ये आपल आवरत होती. नंतर ती हॉल मध्ये आली पण कुणीही तिला घराचा प्लान पाहण्यास विचारले नाही. ती आपापली newspaper वाचत बसलेली. प्लान पाहायलाच नाही बोलावल तर सजेशन मागन तर लांबच. बर असहि नाही की नंदिनी काही शिकलेली नाही चांगली डॉक्टर आहे आणि शिकलेली नसली तरी तिला महत्व देण्याची गरज नाही? त्यानंतर घर बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त ठरला आणि यांच्याकडे कोणताही काम सुरू करण्याआधी पूजा केली जाते त्यामुळे पूजा करायची ठरलेली आणि प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांनी हेसुद्धा नंदिनीला नाही संगितल. त्याच्या आईच म्हणन की काय करायचय तिला, तीच तिला हॉस्पिटल मध्ये खूप काम असतात. पण हे तीन ठरवायला हव होत ना? नाही की ह्यांनी?

गोष्ट ३:

काल मी इंग्लीश विंग्लिश पिक्चर पाहत होते तेव्हा माझ मन माझ्या भूतकाळात भरकटत गेल आणि मला एका काकूंची आठवण झाली. नेहमी मला एका गोष्ठीवरुन बर्‍याच गोष्टी आठवतात आणि मी भरकटते. सवयीप्रमाणे मी तब्बल ७-८ वर्षे मागे गेले. जे माझ्या आयुष्यातले सगळ्यात सोनेरी दिवस. कॉलेजसाठी नाही पण माझ्या रूमसाठी ते दिवस मला सोनेरी वाटतात, मी फार छान आणि निवांत राहीले त्या काळात. मला नाही वाटत तेवढी सुखी मी कधी राहीले असेन. हां तर मुद्दा हा की मला त्या काकूंची आठवण झाली. तिथे माझ्या घर मालकांच्या त्या शेजारी राहायच्या आणि त्यांची मुलगी माझी चांगली मैत्रीण होती त्यामुळे माझ नेहमी तिथे जाण असायच. गप्पा टप्पा नेहमी व्हायचा.

त्यांना दोन मुली, काकू स्वभावाने फार गोड, सतत हसणार्‍या, सतत फ्रेश, नेहमी मुलींच्या मागे पुढे, हे हव का ते नको का म्हणजे फरच प्रिय वाटाव्यात अशा. माझ आणि त्यांच फार जमायच. मी त्यांच्या मुलीला कमी आणि त्यांनाच जास्त बोलायचे. माझी आणि त्यांची फार छान मैत्री झालेली. पण मला नेहमी एक गोष्ट खटकायची ती ही की त्या मुलांबाबतीत फारच शांत, नम्र वागनार्‍या. म्हणजे त्यांच्या मुली त्यांना येता जाता कशाही बोलायच्या कुणासमोरपण आणि त्या काहीच म्हणायच्या नाहीत फक्त हसायच्या. ते मला अजिबात आवडायच नाही कारण मुलं लहान असतील तर ठीक आहे पण लग्नाच्या वयाच्या पोरींनी अस सतत टाकून बोलन. मी अस कधीच पाहील नव्हत एवढ हिडिस फिडीस आणि ते पण शुल्लक गोष्टींवरून? मलाच कधी कधी त्यांना मार द्यावसा वाटायचा. त्या पोरी बोलल्या की त्या एवढस तोंड करून बसायच्या. मला फार दया यायची त्यांची. आणि कधी कधी रागपण की का त्या कधी काहीच नाही बोलत?का सतत गप्प बसतात आणि सहन करतात? बर इथे असही नव्हत की बोलणारी माणसं मोठी आहेत त्या आपल्या पोटच्याच मुली आहेत मग काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे मला अस वाटायच की कधी कधी काही गोष्टी हिसकावून घ्यावाच लागतात त्या आपोपाप मिळत नाहीत.

या अशा खूप सार्‍या गोष्टीआहेत सासू-सुनेच्या, आई-मुलीच्या, बहीण-बहिणीच्या वगेरे. पाहायला गेल तर नचिकेता काही जास्त expect नाही करतेय एवढच म्हणतेय की मला समजुण घ्या आणि एक सांगू का जेव्हा एक सून जॉइंट फॅमिली मध्ये राहते तेव्हा नवर्‍यापेक्षा जास्त तिला सासुच्या सपोर्ट ची गरज असते. आणि जर सासू कडून सपोर्ट मिळाला तर बाकींच्यांकडून आपोआप सपोर्ट मिळतो कारण नाही म्हणल तरी घराची डोर ही एका स्त्रीच्या हातातच असते. आणि नंदिनी एक परकी पोर तुमच्या घरात येते, तुमच्यातली एक तिला करायच असेल तर तिला तुमच्यात सामावून घेतल पाहिजेच आणि ती आई... ती फक्त दोन गोड शब्द मागतेय बाकी काहीच नाही.

मी तर फक्त बोलण्या-वागण्याची उदाहरणं दिलियेत, आपण जर समाजात आणखीन खोलवर जाऊन पाहील तर जाळण्या-मारण्यापर्यंतच्या, स्त्री-भ्रुन हत्येच्या गोष्टी आहेत. कित्येक वेळा यात सासूचा, नणंदेचा, आईचा, सुनेचा पुढाकार असतो. या सगळ्या गोष्टी पहिल्या की अस वाटत की स्त्रीला रेस्पेक्ट ची गरज जास्त कुणाकडून आहे? आपण म्हणतो ना की पृथ्वीतलावर फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरूष. तर आधी एकाच जातितल्या लोकांनी एकमेकांकडे रेस्पेक्टनि पाहण्याची गरज आहे. म्हणजे स्त्री ने स्त्रीला आधी रेस्पेक्ट दिला पाहिजे राइट? आणि आपण असही म्हणतो ना की ज्या पद्धतीने आपण स्वतःकडे पाहतो त्या पद्धतीनेच जग पाहत. तर ते इथेपण लागू होऊ शकत. तर तत्पर्य हे की स्त्रीला आदर हा फक्त पुरुषांनी नाही तर एका स्त्री ने दुसऱ्या स्त्रीलाला पण देण तितकच गरजेच आहे आणि जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मान देणार नाही तोपर्यंत तिला पूर्ण इंपॉर्टेन्स प्राप्त होणार नाही.

Happy Women's Day!

Monday, August 21, 2017

नातं


नातं

कोणतंही  नातं  मानन्यावर  असत
जमलं  तर  जमत  नाहीतर  फसत  
आणि  मधलं  तर  कधीच  कामाचं  नसत

just निभवायचं   म्हणून  निभावण्यात  काहीच  अर्थ  नसतो
पण  तरी  आपण  कितीतरी  वेळा  हेच  करतो
वेळ  साधून  नेणं  कदाचित  आपण  यालाच  म्हणतो

प्रत्येक  फसलेल्या  नात्याला  काहीतरी  background असत
काहीतरी  बोलेल  किंवा  वागलेलं  मनात  कोपऱ्यात  कुठेतरी  असत
कारण  ते  बोलणं  बाण  बनून  मनाला  छेडलेलं  असत

का  असतो  माणूस  असा , का  नाही भरत  तो  छेद  मनाचा
का  बनतो  तो  शब्द  अतिमहत्वाच्या
का  नेहमी  शेमबुड  दिसतो  दुसऱ्याच्याच  नाकाचा

चूक  कधीच  एकाची  नसते
बेरीज  कधीच   दुसऱ्या  अंकाशिवाय  होत  नसते
आणि  टाळी  कधीच  एका  हाताने  वाजत  नसते

शेवटी  काय  नातं  नको  म्हणलं  तरी  निभाव  लागत
म्हणून  आपलं  मानून  राहिलेलं  बरं  असत 
कारण  झालं  गेलं  विसरून  राहण  सगळ्यासाठी  चांगलं  असत

               - कविता लिहिलेला दिनांक: 10 जून 2017

थोडस कौतुक



थोडस कौतुक

स्वतःच्या  सगळ्या  गोष्टी   स्वतःला  चांगल्या  वाटतातच  
पण  कधी  दुसऱ्याचंही  कौतुक  करा  त्यांच्या  चांगल्या  गोष्टींचं

आपण  दुसऱ्यांच्या  हजार  तक्रारी  करतो
पण  कधी  स्वतःत  डोकाहून  बघतो ? 
की  नेमकं  आपण  काय  दुसऱ्यासोबत  करतो ?

का  असतात  काही  असे  की  फक्त  मला  बघा  आणि  फुल  वाहा
तुम्ही  कोणी  असाल  तरी  फक्त  मला  बघा
आणि  सदा  नि  कदा  मला  झेला

स्वतःच   काही  असेल  तर  दुसऱ्यांनी  तोंडभरून  कौतुक  करावं
पण  तसेच  दुसऱ्याच  काही  असेल  तर   यांनी  मात्र  मठ्ठ  बसावं
हे  कुठलं  वागणं  की  सतत  आपण  दुसऱ्यांकडून  अपेक्षा  ठेवावं

अंह  तक्रार  नाही  करतय  कुणाची 
just   लक्षात  आणून  देतेय  की  चूक  कधी  नसते  कुना  एकाची
कारण  टाळी  कधीच  नसते  एका  हाताची

उगाच  म्हणत  नाहीत  जे  पेराल  ते  उगवेल
जसे  द्याल  तसे  मिळेल
आणि  जसे  वागलं  तसे  याच  जन्मात  परत  मिळेल

so का  कुणाला  कमी  लेखायचं
का  कुणाचं  मुद्दाम  कौतुक  नाही  करायचं
अन  का  उगाच  स्वतः  स्वतःला  खात  राहायचं 

त्यापेक्षा  खुल्या  मानाने  राहा ,चांगल्या  गोष्टीच  मनभरून  कौतुक  करा
काही  फरक  नाही  पडत  कुणाला  चांगलं  म्हणालात  तर , चांगलं  बोललात  तर
हं   एक  आहे  की  समोरचा  तेवढाच  खुश  होईल  आणि  आणखीन  तुम्हाला  जवळ  होईल
शेवटी  माणसाला  काय  न्यायचे  असते  पैश्यापेक्षा  माणूस  कमवणं  imp असते

                                - कविता लिहिलेला दिनांक: 18 ऑगस्ट 2017

Monday, November 28, 2016

दोस्ती


दोस्ती
वैसे तो दोस्ती के बारेमे बहोत लोगो ने बोलके रखा है
पर आज मौका है तो मुझेभी ये छोड़ना नही है

वैसे तो हमारा हर रिश्ता बहोत खास होता है
मगर दोस्तो की तो बात ही कुछ अलग होती है
और उसमेभी इस कम्बक्त IT वर्ल्ड मे अछा दोस्त मिलना मुश्किल होता है 

But you know कभी कभी miracle हो जाते है
और चुपके से याराना बन जाता है
जो हमेशा हर घड़ी तुम्हे सपोर्ट करता है

पर जिंदगी का एक दस्तूर है 
हर वक्त एक जैसा होता नई है
और आज भी कुछ ऐसेही होने जा रहा है

पर हमेशा याद आएँगी लंच टेबल पे शेर की हुई कहानियाँ
साथ मे celebrate की हुई पार्टियाँ
और छोटू छोटू लधाइयाँ

पता है पता है अभी सब बोलेंगे
की कोई नही यार हम मिलते रहेंगे
पर बाद मे हमेशा सभी कुछ ना कुछ बहाने मारेन्गे

But कोई problem नई तुम दूर रहो या पास
तुम हमेशाही रहोगे हमारे खास
क्योकि what's up  और skype तो है ही हमारे पास

अब लास्ट मे इतना ही क़हना है
की जिंदगी मे हमेशा तुमको खुश रहना है
और हर बुलंदियों को चुना है..
                                                                                                                         शरयू पाटील
                                                                                                                         24-11-2016
                                                                                              Created on occasion of farewell of friend

Saturday, June 18, 2016

बाबा

बाबा

खरच बाबा म्हणजे घराचा पाया
ज्यांच्या मनात साठलेली असते आई एवढीच माया

प्रतेकजण सारखा कसा राहील
जो तो आपापले प्रेम व्यक्तच कसे करील
सगळे सारखे असता वेगळेपण कसे राहील
म्हणून तर देवाने सर्वांना वेगवेगळ्या साच्यात बनविल

बाबा प्रत्येक गोष्ट सांगत नसतात
ते सतत आपल्या कामात असतात
त्यांच म्हणन की   सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात 
म्हणून तर काही वाईट वाटल की  ते फक्त शांत बसून राहतात

सतत असते त्यांना घराची काळजी
गुंतलेले असतात जमा करण्यात जन्माची पुंजी
कधी लक्षही देत नाहीत की त्यांची कपडे होतायत खूजी
नेहमी हसत मुखाणे प्रत्येकाच्या कामाल होतात राजी

कठोर, कर्तृत्वं, दयाळू असतात ते बाबाच
अन् संकटात आपल्याला आठवतात ते बाबाच
प्रत्येक अडचण स्वत:ची समजुण धावतात ते बाबच
म्हणून तर आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार हे बाबाच

               - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2009 [वय वर्षे-19]

Friday, June 17, 2016

तुम्हारा साथ


तुम्हारा साथ

आज के इस खास दिन कुछ कहना चाहती हू तुमसे
क्योंकि इसी दिन हम जुड़ गये थे दिल से

पहेली नज़र मे ही लगा था की तुमही हो मेरे साथी
और आज मै यही कहूँगी की तुमही हो मेरे महारथी

लगता नही की इतने दीनो से हम साथ है
क्योंकी आज भी तुममे वही पहेली वाली महेक है

तुम्हे अंदाज़ा भी नही की हम तुमपे कितना मरते है
ज़रूरत पड़े तो तुमपे जान छिड़कने के लिए भी तयार है

जी करता है की हरपल  तुम्हारे साथ रहू
और दुनिया के सारे सुख तुमपे निछावर करु

मूज़े तुमसे कुछ भी शीकायत नही
क्योंकि ऐसा कुछ भी नही जो तुमने मुझे दिया नही

 अब जिंदगी मे मुझे और कुछ नई चाहिए
 बस यूँही हर पल मेरे साथ रहिए

                             कविता लिहिलेला दिनांक - २९-०१-२०१६
                                                        [एका मैत्रीणीसाथी तिच्यालग्नाच्या वाढदिवसाला म्हनून लिहुन   दिलेली ]

Sunday, June 12, 2016

पाऊस

पाऊस

तुला माहितीये लहानपणी फिरायला जाताना तू वाटायचास नकोसा
पण पुन्हा कळाल तूच तर देतोस जगाला दिलासा

तुझ्याविना फूल नाही पान नाही काहीच नाही
तू पहिल्यांदा येतोस तेव्हा अंगाची करतोस लाही लाही
पण पुन्हा देतोस शेतकर्यांच्या यशाची ग्वाही
त्यामुळेच तर त्यांच्या घरी सुख-सम्रुधि वाही

कधी कधी अपेक्षेपेक्षा अधिक पडतोस अफाट
मग शेतातली सगळी पिके करतोस सपाट
कधी कधी जून जूलै पर्यंत पाहायला लावतोस वाट
आणि जमीन अगदी होते कोरडी फकाट

तुझमुळे सगळी रस्ते भरतात तुडुंब
पण आमच्या पोटात मात्र फुटतो आटम बॉम्ब
कारण त्यामुळे शाळेत जायची होते बॉम्बाबोंब
म्हणून तर म्हणते ना तू ये आता ताबडतोब

तू कधी काय घेऊन  येशील सांगता येत नाही
कधी सुख तर कधी दु:ख पण रिकामी हाती येणार नाही
हेच तुझे वेशिष्ट्य हो की नाही
आता सगळे तुझी वाट पाहतात मग सांग तू येणार का नाही

                         - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2007 [वय वर्षे-१७]